भारतीय राजकीय विचार

राजा राममोहन रॉय (१७७२ ते १८३३) यांना पहिला आधुनिक भारतीय विचारवंत मानले जाते. बंगालमध्ये श्रीमंत घरात जन्म. सर्व धर्मांचा अभ्यास – कोणताच धर्म सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही असे त्यांचे मत झाले – त्यामुळे सगळ्या धर्मांमध्ये जे चांगले आहेत ते घेऊन १८२८ मध्ये ब्राह्मोसमाजाची स्थापना.

Paper 5 Political Thought राजकीय विचार
Semester 6 – Indian Political Thought – भारतीय राजकीय विचार

Module 1 – घटक १
Ideas on State – राज्यासंबंधीचे विचार

Mahadev Govind Ranade – महादेव गोविंद रानडे (1842 – 1901)

Stalwart हा शब्द यांच्या व्यक्तीमत्वाचे वर्णन करण्यासाठी अगदी योग्य आहे. जी लिंक दिली आहेत त्या पानावर जाऊन या शब्दाचा पूर्ण अर्थ आणि त्याचे समानार्थी शब्द पहा म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला स्पष्ट कळेल. रानाड्यांनी टिळकांना गणेशोत्स्व सुरु करण्यामधील अडचणी समजावून सांगितल्या, वासुदेव बळवंत फडक्यांना सबुरीचा सल्ला दिला, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या बरोबर त्यांचा विचारविनिमय चालू असायचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संदर्भात लिहीलेले ‘Ranade, Gandhi and Jinnah’ हे पुस्तक वाचनीय आहे. त्यांचे काही विचार मात्र त्यावेळी आणि आजही सगळ्यांनाच पटतील असे नव्हते. ब्रिटीशांनी इथे येणे हा मोठ्या ईश्वरी योजनेचा – Divine providence – भाग आहे
त्यांनी आपल्याला इंग्रजी भाषेचा परिचय करून दिला, संसदीय शासन पद्धती, कायदा, घटना, अर्थशास्त्र, समाजशास्त्रे इत्यादी नव्या गोष्टींचा परिचय करून दिला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध केवळ आंदोलने न करता त्यांच्याकडून ज्ञान संपादन केले पाहिजे. सर्व जनता ज्ञानसंपन्न झाल्यावर स्वातंत्र्य आपोआप मिळेल अशी त्यांची भावना होती.

रानडे एक अभ्यासू न्यायाधीश होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले. अनेक सरकारी समित्यांवर त्यांनी काम केले. येथिल शेतीच्या प्रश्नांचा अभ्यास त्यांनी केला. केवळ शेतीवर अवलंबून राहून एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पोसता येणार नाही, त्यामुळे औद्योगिकरण गरजेचे आहे असे मोलाचे विचार त्यांनी त्याकाळात मांडले. इंग्रजांनी औद्योगिकरण मोठ्याप्रमाणावर घडवून आणले पाहिजे हे त्यांचे मत होते.

ते प्रार्थना समाजाचे सदस्य होते. या संस्थेच्या उभारणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. रानाड्यांनी सामाजिक परिषदेची स्थापना केली. काँग्रेसच्या म्हणजेच राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. सर्वांना बरोबर घेेऊन जाण्याचे राजकारण त्यांनी नेहमी केले.

रानाड्यांच्या पत्नी रमाबाई रानडे (१८६२ – १९२४) यांच्याविषयीची “उंच माझा झोका” ही मालिका जरूर पहा. रानाड्यांच्या त्या दुसऱ्या पत्नी – पहिली पत्नी आजरपणामुळे वारल्यानंतर वडीलांचा मान राखायचा म्हणून स्वतःच्या मनात नसतानाही त्यांनी छोट्या रमाबाईंशी विवाह (बालविवाह) केला. परंतु नंतर त्यांना चूल आणि मूल यामध्ये न अडकवता इंग्रजी शिक्षण दिले, समाजकार्याचे महत्त्व पटवून दिले. १९०१ साली रानाड्यांचा मृत्यू झाल्यानंतर १९२४ पर्यंत त्या समाजकार्य करत राहील्या – पुण्यात महिलांसाठी सेवासदन नावाची संस्था त्यांनी सुरु केली.


Mohandas Karamchand Gandhi मोहनदास करमचंद गांधी (1869 – 1948)

महात्मा गांधी – मोहनदास करमचंद गांधी (१८६९-१९४८)

गुजरात मधील पोरबंदर येथे जन्म – My experiments with truth या त्यांच्या पुस्तकात त्यांच्या आयुष्याच्या पूर्वार्धाचे वर्णन – अधिकात अधिक सत्य सांगण्याचा प्रयत्न असे त्यांचे म्हणणे आहे – लंडन मध्ये जाऊन कायद्याची पदवी – मुंबईत काही काळ आणि नंतर बराच काळ दक्षिण आफ्रिकेमध्ये वकीली – समाजकार्य – राजकारण – वर्णद्वेषा विरुद्ध लढा – तिथून २१ वर्षांच्या कार्यानंतर भारतात परत – ९ जानेवारी १९१५ – आज हा दिवस प्रवासी भारतीय दिवस (Non-resident Indian day) म्हणून साजरा केला जातो.

२०१५ साली महात्मा गांधी भारतात परत आले त्याला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमीत्त झालेला कार्यक्रम – पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन परराष्ट्र मंत्री कै. सुषमा स्वराज
Since 2003, PBD conventions are being held every year. Its format was revised in 2015 to celebrate the PBD once every two years and also to hold theme-based PBD Conferences during the interim period with participation from overseas diaspora experts, policymakers and stakeholders. – २००३ ते २०१५ पर्यंत १३ वर्षे सलग हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर सरकारने दर दोन वर्षांनी हा दिवस साजरा करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे २०२१ मध्ये १६ वा प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात आला.


https://youtu.be/mt23ZkovEvo
महात्मा गांधींच्या जिवनावरील १९८२ चा रिचर्ड अॅटनबरा यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट – 3 तास 11 मिनिटांचा हा चित्रपट जरूर बघा.

भारतात परतल्यानंतर महात्मा गांधींनी नामदार गोपाळकृष्ण गोखल्यांना आपले गुरु मानले.

नामदार गोपळ कृष्ण गोखले (१८६६-१९१५) महात्मा गांधींचे गुरु, अर्थतज्ञ, नेमस्त विचारवंत

त्यांच्या सल्ल्याप्रमाणे ते भारतभर फिरून निरीक्षण करून आले. त्यानंतर १९२० मध्ये लोकमान्य टिळक वारल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. १९२०-२१ चे असहकार आंदोलन, १९३० चे सविनय कायदेभंगाचे आंदोलन, १९४२ ची चलेजाव चळवळ, अनेक उपवास, प्रचंड लिखाण, प्रवास, जनसंपर्क – हे सर्व १९४८ साली त्यांची हत्या होईतोपर्यंत अव्याहत चालू राहीले.

Do or Die – Quit India Movement – launched in Mumbai – August Kranti Maidan – 9th August 1942

जॉन रस्कीन यांच्या या पुस्तकावरून महात्मा गांधींना सर्वोदयाची संकल्पना सुचली. Unto this last हे पुस्तक त्यांनी एका बैठकीत – रात्रभराच्या रेल्वे प्रवासात वाचून संपवले. त्याचे भाषांतर करताना त्यांना ‘अंत्योदय’ हा शब्द सुचला. परंतु उदयाची किंवा विकासाची गरज केवळ गरीब दीन-दलितांना नाही तर सर्वांनाच आहे हे लक्षात घेऊन त्यांनी अंत्योदयाऐवजी सर्वोदय हा शब्द स्वीकारला.

In late September 1932, B.R. Ambedkar negotiated the Poona Pact with Mahatma Gandhi. The background to the Poona Pact was the Communal Award of August 1932, which, among other things, reserved 71 seats in the central legislature for the depressed classes. Gandhi, who was opposed to the Communal Award, saw it as a British attempt to split Hindus, and began a fast unto death to have it repealed. – दी हिंदू मधून

१९३० मधील सविनय कायदेभंगाची चळवळ – Civil disobedience movement.

Module 2 – घटक २
Nationalism – राष्ट्रवाद

Rabindranath Tagore – रविंद्रनाथ टागोर (1861 – 1941)

१९१२ साली गीतांजली या आपल्या काव्यसंग्रहासाठी साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवणारे, त्यांचे विचार पूर्णपणे पटत नसले तरी गांधींना “महात्मा” ही पदवी देणारे भारताच्या आजच्या राष्ट्रगीताचे लेखक, (विशेष म्हणजे बांग्लादेशाने सुद्धा त्यांचेच एक गीत त्यांचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे.) शांतीनिकेतनामध्ये विश्वभारती विद्यापीठाची स्थापना करणारे, प्रतिभासंपंन्न राष्ट्रवादापेक्षा आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा पुरस्कार करणारे खरेखुरे विश्वाचे नागरिक!

टागोरांच्या राष्ट्रवाद विषयक विचारांची चर्चा करणारे हे पुस्तक पहा.

जात, धर्म, वंश, वर्ण, संस्कृतीचे श्रेष्ठत्व या वादांमध्ये आणि भेदभावामध्ये पडण्यापेक्षा आपण सगळी माणसे कशी एक आहोत हे जाणून सगळ्यांनी शांततेने आणि आनंदाने जीवन जगले पाहिजे असे टागोरांचे मत होते. युरोपातून आलेला अहंकारावर आधारित राष्ट्रवाद घातक आहे.

जगामध्ये विविधता आहे. ती साजरी करता आली पाहिजे. दुसऱ्या संस्कृतीमध्ये काय चांगले आहे ते घेऊन तिचा सन्मान करता आला पाहिजे. संस्कृती मधील फरकाच्या आधारावर झगडता कामा नये असे त्यांचे मत होते.


Vinayak Damodar Savarkar – विनायक दामोदर सावरकर (1883 – 1966)

स्वातंत्र्यवीर सावराकर – रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जन्म – १९०४ मध्ये अभिनव भारतची स्थापना – – इटलीच्या मॅझिनीचा प्रभाव – महान क्रांतीकारक – अंदमानमधील ५० वर्षांची कारावासाची सजा सुनावली होती – प्रत्यक्षात १९११ ते १९२४ एवढाच काळ ते तिथे होते. १९२४ ते १९३७ त्यांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत राहावे लागले.

हिंदुत्ववाद हा प्रमुख विचार – ज्याची पितृभू आणि पुण्यभू हिंदूस्तान आहे तो हिंदू अशी हिंदू असण्याची व्याख्या त्यांनी केली. यामुळे ख्रिश्चन, मुस्लीम वगळले गेले आणि जैन, बौद्ध, शीख यांचा समावेश हिंदू धर्मात करता आला.

ब्रिटीशांनी नेहमीच हिंदु-मुस्लीम संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाची स्थापना केली, १९०६ मध्ये इंडियन युनियन मुस्लीम लीग या पक्षाची स्थापना केली. त्याचा परिणाम म्हणून त्याचवर्षी हिंदूसभेची स्थापना झाली.

१९५७ चे स्वातंत्र्यसमर हे केवळ शिपायांचे बंड होते असा ब्रिटीश व तत्कालीन भारतीय इतिहासकारांनी केलेला अपप्रचार खोडून काढण्यासाठी स्वा. सावरकर यांनी संशोधन करून लिहिलेला ग्रंथ. प्रकाशनापूर्वीच भारत आणि इंग्लंड या दोन देशांनी जप्त केलेला जगातील हा पहिलाच ग्रंथ.

संदर्भ

  1. Wikipedia
  2. Britannica
  3. Savarkar Smarak.com
  4. Savarkar.org – मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतील संकेतस्थळ – या संकेत स्थळावर सावरकरांविषयी बरीच माहिती एकत्रित केली आहे.

सावरकरांची पुस्तके (Courtesy – Savarkar.org)

Module 3 घटक ३
Rational and Radical Reform – विवेकाधिष्ठीत आणि मूलगामी सुधारणा

Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर (1856 – 1895)

गोपाळ गणेश आगरकर (१४ जुलै १८५६ ते १७ जून १८९५) अवघे ३९ वर्षांचे (अगदी नेमके सांगायचे तर ३८ वर्षे ११ महिने ४ दिवस) आयुष्य लाभलेले महान समाजसुधारक आणि विचारवंत

गोपाळ गणेश आगरकर (१८५६ ते १८९५) – अवघे ३९ वर्षांचे आयुष्य! १९ व्या शतकातील सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणारे त्यागी, ध्येयवादी व्यक्तीमत्व.  नेपोलियन प्रमाणेच आगरकरांच्या शब्दकोषात अशक्य हा शब्द नव्हता.

वि. स. खांडेकर (१८९८ ते १९७६) यांनी गोपाळ गणेश आगरकरः व्यक्ती आणि विचार हे संपादीत पुस्तक १९४५ साली पहिल्यांदा प्रकाशित केले.  त्याला त्यांनी लिहीलेली विस्तृत प्रस्तावना वाचनीय आहे.  जानेवारी १९९७ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसने त्याचे पुनर्मुद्रण केले.  मागणी वाढल्यामुळे २०१६ मध्ये त्याचे पुनर्मुद्रण करण्यात आले.

आगरकरांचा जन्म कऱ्हाड मधील टेंभू या छोट्या गावात एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला.  शिक्षणाची आस त्यांच्याकडे प्रचंड होती.  दारिद्र्यामुळे त्यांना शिक्षण मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.  रत्नागिरी, अकोला, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी नातेवाईकांकडे राहून, मिळेल ती नोकरी करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.  “कित्येक वेळा त्यांनी एका सदऱ्यावर कॉलेजातले दिवस काढले.  तो दिवसा धुऊन वाळत घातला तर अंगात घालायला दुसरा नाही;  म्हणून रात्री जिकडेतिकडे सामसूम झाल्यावर स्वारीने अंगातला सदरा धुऊन वाळत घालाव आणि सकाळी तो वाळला म्हणजे अंगात घालावा.”

त्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकर (१८५० ते १८८२) आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (१८५६ ते १९२०) यांच्या बरोबर त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल (१८८०), केसरी (१८८१, मराठी), मराठा (१८८१, इंग्रजी), फर्ग्यूसन कॉलेज (१८८४) या संस्था उभ्या केल्या.  अर्थात फर्ग्यूसन ची स्थापना करताना चिपळूणकर हयात नव्हते. 

समवयस्क असलेल्या टिळकांबरोबर झालेल्या वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी १८८८ साली स्वतंत्रपणे सुधारक या वर्तमानपत्राची स्थापना केली.  “तत्वनिष्ठा ही एक अत्यंत कठोर देवता आहे.  जीवनातल्या अनेक नाजूक भावनांचा बळी घेतल्याशिवाय ती प्रसन्न होत नाही.”  हा अनुभव आगरकरांनाही आला.  “त्यांच्या भावनाशीलतेने त्यांच्या ध्येयनिष्ठेला कधीही दगा दिला नाही…त्यांनी सदैव निर्भय टीका केली.”

पुढे १८९५ पर्यंत म्हणजे त्यांच्या आयुष्यातील शेवटची सात वर्षे ते अखंड सुधारणावादी लिखाण करीत राहीले.  “…जुन्याच्या भजनी लागून गुलाम झालेल्या परंपरा पवित्र असलीच पाहिजे या कल्पनेने अंध होऊन पदोपदी चाचपडत राहणाऱ्या आणि मंद बुद्धीने व बधिर भावनांनी जीवन कंठीत राहिल्यामुळे आपली प्रगती कुठित करून घेतलेल्या हिंदू समाजाच्या गळी अनेक कटू सत्ये उतरविण्याचे कार्य आगरकरांनी ‘सुधारक’ काढल्यापासून निष्ठेने आणि धैर्याने केले.”

आगरकरांच्या विषयी लिहीताना हे लक्षात येते की जगातील विचारवंतांचे डावे आणि उजवे असे विभाजन होण्याच्या आधीच्या काळात आपले चिंतन करीत होते.  मार्क्स (१८१८ ते १८८३) आणि मील (१८०६ ते १८७३) हेही समकालीनच.  पण आगरकरांवर मार्क्स पेक्षा मीलचा आणि स्पेनसरच्या (१८२० ते १९०३) विचारांचा प्रभाव अधिक होता.  मील प्रमाणेच लांबच लांब आणि पल्लेदार वाक्ये लिहिण्याची त्यांची आवड त्यांच्या लिखाणात सर्वत्र दिसून येते.

वि. स. खांडेकरांनी आगरकरांविषयी लिहीलेले वाक्य अगदी सार्थ आहे – 

“आत्मविश्वासाशिवाय कुठलाही समाज जगू शकत नाही;  पण आत्मपरीक्षणाशिवाय त्याची कधीही प्रगती होऊ शकत नाही.  १८ व्या शतकात महाराष्ट्रीय समाजाची ही दोन्ही अंगे विकल झाली होती.  विष्णुशास्त्र्यांनी पहिल्याला संजीवनी दिली.  दुसऱ्यांच्या बाबतीत आगरकर धन्वंतरी ठरले. ”

वि. स. खांडेकरांनी संपादीत केलेल्या पुस्तकातील काही उतारे माहीतीसाठीः-

“आम्ही विद्यार्थ्यांना शिकवणार, तयार करणार;  आमचे आचरण पाहून विद्यार्थी तयार होणार, आम्हीच चर नाटकी आणि व्यसनी लोकात राहू लगलो, त्यांच्यासारखेच झालो तर आमच्यापासून आमचे विद्यार्थी शिकणार तरी काय ?  हेच का ?  समाजाचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या माणसाने – मग त्याचा पेशा शिक्षकाचा असो वा लेखकाचा असो, समाजसेवकाचा असो अथवा राजकारणी पुरुषाचा असो – शुद्ध चारित्र्याची चाड बाळगली पाहिजे, या गोष्टीविषयी त्यांचा कटाक्ष होता. ”

“ज्यांच्या अवयवांची पूर्ण वाढ झाली आहे, ज्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागावर तारूण्याचे तेज चकाकत आहे, विषयवासना जागृत झाल्यामुळे उल्हासाने, उत्कटतेने, अननुभूत सुखास्वादाच्या अहर्निश चिंतनाने ज्यांच्या अंगव्यापारात, दृष्टीत व चर्येत लज्जा, अधीरता, साशंकपणा वगैरे परस्परविरोधी अनेक मनोविकार वारंवार प्रतिबिंबित होऊ लागले आहेत; एकमेकांस प्रिय होण्याविषयी ज्यांचे हरएक प्रयत्न चालले आहेत;  विद्या, वित्त, सौंदर्य वगैरे गुणांनी आपणांस होईल तितके अलंकृत करून मोह पाडण्याविषयी जे अहोरात्र झटत आहेत;  ज्यांना आपण रतिमन्मथाचे पुतळे आहो व विधात्याने आपली विवाहमैत्री व्हावी असे योजूनच आपणास निर्माण केले आणि आपल्याहून अधिक सुखी असे दांपत्य कोठेही असू शकण्याचा संभव नाही असे वाटू लागले आहे;  अन्योन्य समागम दुरावणारा प्रत्येक क्षण ज्यांस युगतुल्य झाला असून, जे सूर्याच्या अश्र्वास मंदगतित्वाबद्दल निंदू लागले आहेत व यामिनीस आपली समागमकारिणी मैत्रीण मानून तिच्या वाटेकडे जे डोळे लावून बसले आहेत अशा स्त्रीपुरुषांच्या प्राथमिक रतिसुखाची बहार कोणीकडे आणि पंतोजींचा मार खाणाऱ्या व अभ्यासाखाली अर्धमेल्या झालेल्या दुर्बल, भेकड आणि लुस्कान अशा आमच्या १६-१७ वर्षांच्या बहुतेक पोरांच्या आणि बाहुलाबाहुलीचा व भातुकलीचा ज्यांचा खेळ नुकताच सुटला आहे  व नवरा म्हणून ज्याच्याशी आपला एकप्रकारे विशेष संबंध आला आहे असा पुरुषजातीपैकी कोणी एक इसम आहे, असे ज्यांना नुकतेच कोठे समजू लागले आहे अशा आमच्या १२-१३ वर्षांच्या निस्तेज, लाजाळू व अज्ञान पोरीच्या, बळजोरीच्या महालाची बहार कोणीकडे ?

आगरकरांच्या विषयी लिहीताना हे लक्षात येते की जगातील विचारवंतांचे डावे आणि उजवे असे विभाजन होण्याच्या आधीच्या काळात आपले चिंतन करीत होते.  मार्क्स (१८१८ ते १८८३) आणि मील (१८०६ ते १८७३) हेही समकालीनच.  पण आगरकरांवर मार्क्स पेक्षा मीलचा आणि स्पेनसरच्या (१८२० ते १९०३) विचारांचा प्रभाव अधिक होता.  मील प्रमाणेच लांबच लांब आणि पल्लेदार वाक्ये लिहिण्याची त्यांची आवड त्यांच्या लिखाणात सर्वत्र दिसून येते.

फर्गसन महाविद्यालय, पुणे
न्यू इंग्लिश स्कूल – या शाळेतही आगरकरांनी अध्यापन केले.


Bhimrao Ramji Ambedkar – भीमराव रामजी आंबेडकर (1891 – 1956)

1936 साली स्थापन केलेला पक्ष
Dr. Babasaheb Ambedkar writings and speeches
३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाची स्थापना झाली.
पहिला अंक ३१ जानेवारी १९२०
आदरणीय दादासाहेब गायकवाड (भाऊराव कृष्णराव गायकवाड – १९०२ ते १९७१) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर – नाशिक रेल्वे स्टेशन नोव्हेंबर १९४५ – श्रेय विकिपीडीया
प्रकाश यशवंत आंबेडकर (जन्म १९५४)- बाळासाहेब आंबेडकर – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू – संसद सदस्य (१९९९ ते २००४) – अकोला पॅटर्न – १९९० ते १९९६ राज्यसभा सदस्य – १९९४ – भारिप बहुजनमहासंघ – २०१९ – वंचित बहुजन आघाडी
दादासाहेब रुपवते

Module 4 घटक ४
Socialism – समाजवाद

Jawaharlal Nehru – जवाहरलाल नेहरू (1889 – 1964)

पंडीत जवाहरलाल नेहरू यांची पुस्तके
“I also recall, with equal pride, that the first woman to occupy this eminent chair was an Indian Smt. Vijayalakshmi Pandit, in 1953 during the 8th session.” – Sushma Swaraj at the UNGA
नेहरू आणि सुभाषचंद्र बोस


Rammanohar Lohia राममनोहर लोहीया (1910 – 1967)

“Ram Manohar was very much misunderstood by his contemporaries. Perhaps his ideas were too original to be understood fully while his straight forwardness was unpleasant to many”.

Loknayak Jayaprakash Narayan

People will surely listen to me, but after I am dead

डॉ. राममनोहर लोहीया यांचे उच्च शिक्षण जर्मनी मधील हम्बोल्ट विद्यापीठात झाले.

राममनोहर लोहीयांविषयी अधिक माहिती

अधिक माहितीसाठी हा एप्रिल २०२२ मधील लेख वाचा.

Similar Posts